Thursday, 14 August 2014

खर्च झाल्याचं काही वाटत नाही, पण हिशोब नाही लागला कि त्रास होतो. फसवले गेलो कि दुःख होते आणि एखाद्याला आपण फसवलं तर..? आनंद.. आसुरी आनंद.


देव माणसात आहे म्हणतात.. बरोबर देव माणसात आहे. मग जसा देव माणसात आहे तसा राक्षस पण कुठे बाहेर नाही.. तो पण माणसातच.. 


दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक बिबट्या आणि एक कुत्र एकाच विहिरीत पडले होते. जनरली बिबटे कुत्र्यांना पण मारतात. पण यावेळी असं झालं नाही. एक दिवस एक रात्र एकत्र असूनही बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला नाही. का माहितीय ? कारण प्राणी भूक नसेल आणि स्वतःस काही धोका वाटत नसेल.. तर कधीच हल्ला करत नाहीत.. प्राण्यांचं इतकं साधं सरळ गणित असतं. पण माणूस हा मोठ्या मेंदूचा हुशार प्राणी. दुस-यांना सुख देऊन आनंदी होण्यापेक्षा दुस-यांना दु:ख देऊन जास्त आनंदी होतो. विचार करा.. आपल्यात काय आहे ? देव कि दानव.. कसं आहे आपलं आचरण ? देवाचं कि दानवाचं..

एक शायरने फार सुंदर लिहिलंय पहा..

"तोरा मन दर्पण कहलाये..,
भले बुरे सारे कर्मो को देखे और दिखाए..!!"

विचार करा.. 
मला विचारलेला प्रश्न..:

लय माणसात देव आहे म्हणता, मग तुम्ही कोणत्या माणसात देव पाहिला ? 

माझ उत्तर : 
माणसात देव पाहायला शिकवणा-यामध्ये.. माझ्या आई-वडिलांमध्ये.. जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर मला वेगवेगळ्या गोष्टी शिकवणा-या सर्वांमध्ये.. तुमच्यात पण..

अणि याबरोबरच मी मागे म्हणालो तस, जसा देव माणसात आहे.. तसेच राक्षस पण कुठे बाहेर नाही.. तोपण.. माणसातच..

आता आपण काय आहोत हे ज्याच त्याने आपलच ठरवायचय.. कारण आपण इतरांना फसवू शकतो.. आपल्या मनाच काय?

तोरा मन दर्पण कहलाये..
भले बुरे सारे कर्मो को देखे और दिखाए..!!

_/\_

Wednesday, 13 August 2014

कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी

टी व्ही वर कबड्डीचे सामने पाहताना मराठी शाळेची आठवण झाली. मुंबईवरून गावाला आलेलो असल्याने स्पेशल ट्रीटमेंट मिळायची मला.. मजा यायची या शाळेत.. आमचे आवडीचे खेळ जोडसाखळी आणि ईशामृत. जोडसाखळीत खेळाडू कितीपण चालतील पण संख्या सम पाहिजे एकावर राज्य आल्यावर एक मोकळा राहिला पाहिजे. राज्यावाल्याने जो एकटा असेल त्यालाच पकडायच बाकीच्यांनी त्याला जोड देऊन वाचवायच.. ईशामृतमधे कितीपण खेळाडू चालायचे ज्याच्यावर राज्य आल तो ईशावाला.. बाकीचे सगळे अमृतावाले, राज्यावाल्याचा स्पर्श झाला की ईश यायच.. मग गप खाली बसून रहायच बाकीच्यांकडून अमृत भेटत नाही तोपर्यंत..पण उभ असताना पकडल तर मग आउट.. ईशामृताचा असा साधासोप्पा खेळ.. कबड्डीपेक्षा हेच खेळ जास्त खेळायचो.. हे खेळ खेळतानाही हाताने मांडीवर थाप मारून 'तुह्या मायला ये इकड तुह्याक बगतो' अस आव्हान द्यायचे बाकीचे, हे आव्हान देण मला शेवटपर्यंत नाही जमल.. शाळेचे एक ते चौथीच अर्ध वर्ष मुंबईत होतो पण या साडेतीन वर्षापेक्षा गावच्या झेडपीच्या शाळेतले सहा महीनेच जास्त लक्षात राहिलेत..
  _/\_